---Advertisement---

I Am Like the Sun

|
Facebook
---Advertisement---

सूर्यासारखा मी आहे — स्वप्रकाशी जीवनाचं रहस्य

सूर्यासारखा मी आहे. हंसः या शब्दाचा एक अर्थ आहे — अहं सः : तोच मी आहे.

आणि दुसरा, अधिक सूक्ष्म अर्थ असा — मी सूर्यासारखा आहे.

सूर्य तेजस्वी आहे, सर्वांचा प्राण आहे. कारण सूर्य हा काही मुन्सिपालटीचा दिवा नाही. तो फक्त प्रकाश देत नाही, तर जीवन देतो. एकदा एक मनुष्य रोज सूर्याला नमस्कार करत असे. त्याची टिंगल करत कुणीतरी म्हणालं, “सूर्य प्रकाश देतो म्हणून त्याला नमस्कार करता? मग मुन्सिपालटीच्या दिव्यालाही करा!” पण त्या उपहास करणाऱ्याच्या ध्यानात हे आलं नाही की, दिवा केवळ उजेड देतो; सूर्य प्रकाशासोबत जीवन देतो.

सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च — सूर्य हा स्थावर-जंगम सृष्टीचा आत्मा आहे.

वैज्ञानिक गणित सांगतं की सूर्य एका सेकंदाला चार लाख टनांपेक्षा अधिक ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणूनच तो अवघ्या जीवसृष्टीचा प्राण आहे. तसाच, माझ्या संपूर्ण जीवनाचा प्राण ‘मी’ आहे. या शरीरावर सत्ता माझी आहे. माणूस जेवायला बसतो तेव्हा त्याच्या मनात हा भाव असला पाहिजे — या शरीरावर नियंत्रण माझं आहे. किती खायचं, खायचं की नाही — हा निर्णय माझा आहे. भजी आवडतात? जरूर खा. पण रसना माझ्यावर राज्य करू नये. माझं राज्य रसनेवर असलं पाहिजे. तेव्हाच मी म्हणू शकतो — मी प्राण आहे.

म्हणून शास्त्र सांगतं, भोजन करताना असा भाव असावा की, “मी हंसः आहे.”

ब्राह्मण जेव्हा हंसः हा मंत्र म्हणतो, तेव्हा अनेकदा आपल्याला त्यात दडलेला अर्थ कळत नाही. पण जेव्हा तो अर्थ उमगतो, तेव्हा आपोआप मस्तक झुकतं.

हंसः म्हणजे — माझं शरीर माझ्या अधीन आहे. माझी प्रत्येक इंद्रिय माझं ऐकते. मी इंद्रियांचा गुलाम नाही. अंतिम अंकुश ठेवणारी कंट्रोलिंग पावर मी आहे. माझंच मत अंतिम आहे — दुसऱ्याचं नाही, भगवंताचंसुद्धा नाही. जर मला हरामखोर व्हायचं असेल, तर त्याची मुभा मला आहे. कारण भगवंताने प्रत्येकाला इच्छास्वातंत्र्य दिलेलं आहे.

तात्त्विक दृष्ट्या, माणसाला स्वतःच्या मर्जीनुसार वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे — हरामखोर होण्याचंसुद्धा. पण मग परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. नंतर देवापाशी रडायचं नाही — “देवा, तुझ्या दरबारात विषमता का?”

तेव्हा भगवंत शांतपणे म्हणेल — “ही विषमता माझी नाही; ही तुझ्या कर्मांची आहे.”

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment