---Advertisement---

Who Controls the Senses? The Power of Self-Discipline and Awareness

|
Facebook
---Advertisement---

इंद्रियांचा पट्टा कोणाच्या हातात? | आत्मसंयम आणि आत्मजागृतीचे रहस्य

सकाळी सकाळी मुंबई शहरात फिरायला गेलात, तर एक मजेदार पण अंतर्मुख करणारे दृश्य हमखास दिसते. मोठमोठे लोक आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघालेले असतात. सामान्य माणसांच्या मुलांना जितके खायला मिळत नसेल, त्याहून अधिक पौष्टिक आहार हे लोक आपल्या कुत्र्याला देतात. परिणामी कुत्रे लठ्ठभरी, दमदार आणि उन्मत्त झालेले दिसतात. खरं पाहिलं तर मालक म्हणतो की, “मी कुत्र्याला फिरायला घेऊन आलो आहे.”

पण प्रत्यक्षात चित्र उलटं असतं. कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा मालकाच्या हातात असतो, पण कुत्र्याच्या अंगात रग इतकी असते की तो पुढे धावत असतो आणि मालकाला त्याच्या मागे धावाधाव करावी लागते. बाहेरून पाहणाऱ्याला स्पष्ट कळतं—इथे मालक कुत्र्याला फिरवत नाही, कुत्राच मालकाला फिरवत असतो. हेच चित्र आपल्या जीवनात इंद्रियांच्या बाबतीत घडतं.

इंद्रिये उन्मत्त झाली, तर जिवात्म्याला त्यांच्या मागे पळायला भाग पाडतात. पण यासाठी इंद्रिये जबाबदार नसतात. मालक जबाबदार असतो. इंद्रिये म्हणजे साधनं आहेत; स्वामी नाहीत. “मी प्राण आहे” ही जाणीव.

माणसाने एक गोष्ट मनापासून मान्य केली की— “मी प्राण आहे”, तर तो दोषांचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाही. माझं मन असं आहे, माझी बुद्धी तशी आहे, माझ्या परिस्थितीमुळे असं झालं—अशा तक्रारी तो करत बसत नाही. कारण त्याला कळलेलं असतं की माझ्याजवळ इच्छा-स्वातंत्र्य आहे. आणि ते वापरायचं की नाही, हा निर्णय माझाच आहे. जर इच्छा-स्वातंत्र्य वापरलं नाही, तर इंद्रिये उन्मत्त होतात. आणि मग ती आपल्याला ओढत नेतात—जशी ती कुत्री आपल्या मालकाला ओढत नेतात.

गीतेचा स्पष्ट संदेश

गीतेत श्रीकृष्ण किती स्पष्टपणे सांगतात— आधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् |

ज्याने गीता वाचली आहे, त्याच्या जीवनात असा कोणताही संशय उरत नाही. आणि गीता वाचूनही जर संशय शिल्लक असेल, तर समजून चालावं—गीता कळलेलीच नाही.

अहं सः — जबाबदारीची घोषणा

“अहं सः” म्हणजे— ते ब्रह्म मी आहे, तोच ईश्वर मी आहे.

जसा या विश्वाचा ईश सूर्य आहे, तसाच मीही सूर्याप्रमाणे प्राण आहे. मी माझ्या जीवनाचा अधिकारी आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक कृतीचा जबाबदार मीच आहे. ही जबाबदारी उचलण्याची तयारी माणसात असली पाहिजे. कारण जबाबदारी स्वीकारली की स्वातंत्र्य अर्थपूर्ण होतं.

‘मी’ आणि ‘तू’ — वेदांताचा पूर्णविराम

हंसः या शब्दात जितकं वैयक्तिक वर्णन आहे, तितकंच सामाजिक शिक्षणही दडलेलं आहे.

हा मंत्र दोन गोष्टींकडे आपलं लक्ष वेधतो— ‘मी’ आणि ‘तू’. हा ‘मी’ आणि ‘तू’ मिळूनच विश्व पूर्ण होतं. या मंत्रात ‘मी’चंही वर्णन आहे आणि ‘तू’चंही. आणि नंतर या दोघांचा संबंध स्पष्ट केला आहे.

इथेच वेदांत पूर्ण होतो— स्वतःची ओळख, समोरच्याची जाणीव आणि त्या दोघांमधील अद्वैत.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment